प्रतिनिधी (मुंबई) राज्यसह संपूर्ण देशात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील शालेय विद्यार्थ्यांना सकाळी झेंडावंदन केल्यानंतर सार्वजनिक सुट्टी दिली जाते. आता मात्र यापुढे ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी केला आहे. त्यामध्ये सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीम्स विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाच्या आयोजन करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
26 जानेवारी च्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास आपली महान संस्कृती आणि देशाचे भवितव्य याबद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे 26 जानेवारी 2025 पासून प्रजासत्ताक दिन सर्व माध्यमाच्या सर्व सरकारी खाजगी शाळांमध्ये विविध कार्यक्रमास साजरा केला जाणार आहे. अशी असे परिपत्रकात म्हटले आहे या दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावेत यासाठी आठ स्पर्धा आणि कार्यक्रमाची यादी दिली आहे ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी, वकृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा, नृत्य ,चित्रकला ,निबंध, क्रीडा स्पर्धा ,आणि स्पर्धा प्रदर्शने याचा समावेश केला आहे. हे सगळे कार्यक्रम देशभक्तीपर थीमवरच असावेत असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांनी या निर्देशाची अंमलबजावणी करावी असे आदेश दिले आहेत.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.