देवगांव (बु )प्रतिनिधी. दि 10.
परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु ) येथे इफ्तार पार्टीचे आयोजन दरवर्षी सालाबादप्रमाणे शिवाजी कासारे यांच्या वतीने केले जाते या वर्षी देखील त्यांनी सर्वं मुस्लिम बांधवांना एकत्र करून इफ्तार पार्टीची मेजवानी दिली.आज समाजात वाढत चालेल्या सर्वं जातीभेदाच्या भिंती या ग्रामीण भागात तरी मजबूत आहेत, आज ही ग्रामीण भागामध्ये सर्वं जाती धर्माचे लोक हे मिळून मिसळून, सालोख्याने आणि गुण्या गोविंदाने राहतात.हीच आपली परंपरा आणि संस्कृती आपण या माध्यमातून जपावी हाच उद्देश मनामध्ये ठेवून आपण दरवर्षी सर्व मुस्लिम बांधवाना एकत्र करून इफ्तार पार्टीचे आयोजन करत आहोत असे शिवाजी कासारे यांनी यावेळी बोलताना सांगितले.या मेजवानीसाठी सलीम शेख,रिजवान शेख, बबन शेख,शिवाजी शिंदे, दत्ता म्हलारे,जावेद शेख, हनुमंत साळुंखे,महादेव भराडे, अनिस शेख,रफिक शेख, समसूद्दीन शेख,महेश कासारे व गावातील इतर ही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.